सावंतवाडी,दि.२२: ‘नात प्रेमाचं आणि वचन विकासाचं’ हा ध्यास उराशी बाळगून इन्सुली मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी आता सज्ज झाले आहेत. जिल्हा परिषद इन्सुली सदस्य श्री. नितीन एकनाथ राऊळ व पंचायत समिती इन्सुली सदस्य श्री. सदाशिव विठ्ठल राणे यांच्या संयुक्त ‘जनसंपर्क कार्यालयाचा’ भव्य उद्घाटन सोहळा आज, रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता संपन्न होत आहे.
हे कार्यालय जुना मुंबई-गोवा हायवे, इन्सुली घाट पायथ्याशी असलेल्या (डोबाची शेळ) येथे झेड.पी. ऑफिससुरू करण्यात येत आहे. या कार्यालयाचे उद्घाटन निगुडे गावचे युवा उद्योजक श्री. सागर नारायण राणे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी बांदा येथील युवा उद्योजक श्री. निलू देसाई आणि निगुडेचे माजी उपसरपंच श्री. गुरुदास गवंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सायंकाळी ठीक ८:०० वाजता उपस्थित मान्यवरांचा स्वागत व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यासाठी इन्सुली, क्षेत्रफळ, शेर्ले, कास, निगुडे, डेगवे, वाफोली आणि रोणापाल परिसरातील सर्व नागरिक, हितचिंतक व मित्रपरिवाराला निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून रात्री ९:०० वाजता उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या भागातील नागरिकांना आपल्या तक्रारी व गाऱ्हाणी मांडण्यासाठी आता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. तरी या मंगलप्रसंगी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री. नितीन राऊळ आणि श्री. सदाशिव राणे यांनी केले आहे.



