सावंतवाडी,दि.१२: येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचालित कळसुलकर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या तब्बल ५३ विद्यार्थ्यांनी विविध पदके मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय व्हावी, या उद्देशाने दरवर्षी या परीक्षेचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो.
या परीक्षेत इयत्ता चौथीमधून सुवर्णपदक विजेते म्हणून धारा महेंद्र कोरगावकर (१६८), चैतन्य प्रदीप सावंत (१५८) व कृष्णा उमेश पायशेट (१५६) यांनी यश संपादन केले. रौप्यपदक विजेत्यांमध्ये अवनी प्रताप आवटे, कौशल सद्गुरू मसुरकर, सार्थक शांताराम नाईक, चैत्राली लक्ष्मण काळे, गार्गी रुपेश कुमार गुंजाळ, रत्नाराम सोपान रबारी, श्रेष्ठ विठोबा कडव, वेद गोपाळ गवस, गार्गी विशाल पई, कौस्तुभ कृष्णा पास्ते आणि संकेत शरद परब यांचा समावेश आहे. तर तन्वी दीपक सरमळकर, शौर्य विशाल अपराध, सार्थक धोंडी वरक आणि हरून इरफान सय्यद यांनी कांस्यपदक पटकावले.
इयत्ता तिसरीतून हिमानी अनिल कोलगावकर व दर्श किशोर पडते यांनी सुवर्णपदक, तर प्रत्युष समीर जाधव, ध्रुव हर्षल नाडकर्णी, आत्रेया आचार्य, युगराज सावरवाडकर आणि आरोही अमित अरवारी यांनी रौप्यपदक मिळवले. शिवम हर्षल नाडकर्णी, श्राव्या समीर परब, देवांश दीपेश परब, प्रणव महेश धुरी आणि रुद्र विश्वास शिंदे यांनी कांस्यपदकावर नाव कोरले.
इयत्ता दुसरीच्या वर्गातून आर्यन बालाजी बोळेगावे, स्वरांग प्रसाद गावडे, दीक्षा पराग टिळवे, साईशा मंगेश देसाई, ईश्वरी आनंद मोर्ये, आयुष अमोल लुष्टे, ऋग्वेद अर्जुन रणशूर, वेदांश रवींद्र कदम, वेदांत भगवंत गावडे आणि प्रांजली विलास सोनटक्के या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकून विशेष चमक दाखवली. तसेच स्वयं गणेश भंडारे, परी विनोद जाधव, अर्चना शामसुंदर सावंत आणि परिधी सचिन कोयंडे यांनी रौप्यपदक, तर दूर्वा सिद्धेश कानसे, वेदांत चंदन गिरप, रिद्धी विकास परब, स्पृहा राजेंद्र वडार, स्वराली विश्वेश पांगम, आराध्या महेश तुर्केवाडकर, उत्कर्ष उमेश मुरकुटे, स्वरा गुरुदास राऊळ आणि सुखम विजय करमळकर यांनी कांस्यपदक प्राप्त केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना श्री. डी. जी. वरक, स्मिता घाडीगावकर, अमित कांबळे, श्रीम. लोके, स्वरा राऊळ व संजना आडेलकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. शैलेश पई, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, सर्व संचालक, मुख्याध्यापक श्री. प्रदीप सावंत, शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी मुख्याध्यापक प्रदीप सावंत यांच्यासह मार्गदर्शक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.



