मुंबई,दि.२९ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या तारखा बदलल्या असून आता जिल्हा परिषद निवडणूक २ दिवस लांबणीवर गेल्या आहेत. आता ५ फेब्रुवारी ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहेत. तर ७ ऐवजी ९ फेब्रुवारीला निकाल लागेल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. तारखा बदलल्याने उमेदवारांना आता प्रचारासाठी थोडा दिलासा मिळाला असून निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे प्रचारासाठी दोन दिवसांची वाढ मिळाली आहे.



