सिंधुदुर्ग,दि.२०: कोकणच्या या सुवर्णभूमीत आता समृद्धीचे नवे वारे वाहत असून सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या महामार्गावर वेगाने घोडदौड करत आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांमुळे जिल्ह्यातील बळीराजा आज खऱ्या अर्थाने सक्षम आणि स्वावलंबी होत आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ लाख २१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आजवर सात हप्त्यांचे एकूण २५ कोटी १६ लाख रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. ही केवळ आर्थिक मदत नसून, जिल्ह्यातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या घामाला मिळालेली यथोचित पावती आहे.


शासनाच्या विविध कृषी योजनांच्या भक्कम पाठबळामुळे जिल्ह्यातील शेतीला नवे बळ मिळाले असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्थिक स्थैर्याच्या जोरावर सिंधुदुर्गचा शेतकरी आता प्रगतीचे नवे शिखर गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. कृषी समृद्धीतून जिल्हा विकासाचे हे स्वप्न आता सत्यात उतरत आहे.

प्रस्तुती: जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग
6560634953310849580-1024x791.jpg)





