विद्यार्थी आणि शिक्षकांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा
सावंतवाडी,दि १८: सह्याद्रीच्या कुशीत वसलेले व सैनिकी वारसा लाभलेले कलंबिस्त हे गाव. येथील हायस्कूलच्या सभागृहामध्ये तब्बल २४ वर्षानंतर सन १९९८-९९ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. याकरिता संस्थेने व जाधव सरांनी हॉल उपलब्ध करून दिला या स्नेह मिळाव्यासाठी सर्व गुरुजनांना आग्रहाचे निमंत्रण दिले होते.
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक व माजी मुख्याध्यापक जी. व्ही सावंत सर, श्री. व्ही. आर. पाटील सर श्री. नाईक सर, श्री मोहिते सर, श्री रामचंद्र सावंत, श्री मधुकर कदम उपस्थित होत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिगवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थित गुरुजन श्री सावंत सर श्री पाटील सर श्री नाईक सर श्री मोहिते सर श्री रामचंद्र सावंत श्री मधुकर कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून माजी विद्यार्थ्यांकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपला परिचय व अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला उपस्थित गुरुजींनी मनोगते व्यक्त करताना आपण विद्यार्थ्यांना घडवत असता ना शिस्त व शिष्टाचाराचे संस्कार करून सक्षम पिढी घडविली याची कबुली दिली माननीय पाटील सर नाईक सर मोहिते सर यांनी विद्यार्थ्यांचे किस्से कथन केले “या या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपल्या तिन्ही सांजा झाल्या या युक्तीनुसार गुरुजनांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक करत शाळा व गाव सदैव जोडून ठेवा असा संदेश दिला.
आयोजक विनोद पास्ते, जयप्रकाश मडगावकर व कवी रवींद्र तावडे यांनी प्रेमाच्या कविता सादर करून सर्वांची मने जिंकली सर्व माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला व छत्रपती शिवाजी महाराज फ्रेम देऊन शाळेच्या गरजा समजावून घेऊन प्रत्येकाने खारीचा वाटा उचलन्याचे आश्वासन दिले त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.पिंकेश राऊळ यांनी केले. श्री. या स्नेह मेळाव्यासाठी किरण गावडे रविंद्र तावडे, संतोष ठाकूर, जयप्रकाश मडगावकर, विजय पास्ते, उज्वला आईर, पिंकेश राऊळ, साईप्रसाद सावंत, नारायण पास्ते, सिमा पास्ते, सविता सावंत, मनिषा सावंत, प्रदिप तावडे, अमित राऊळ, सुनिल सावंत, सुवर्णा राणे, सुवर्णा मडगावकर, दर्शना सावंत, दिपक देसाई, शैलेश पवार, भाग्यश्री सावंत, दर्शना राऊळ, विनोद पास्ते, शुभांगी पास्ते, रमेश राऊळ असे ३५ विद्यार्थी उपस्थित होते.
शेवटी कार्यक्रमाचे आभार जयप्रकाश मडगावकर यांनी केले तसेच शाळा व संख्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनापासून आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.