सावंतवाडी,दि.०८: सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजने मार्च २०२६ च्या एसएससी (SSC) बोर्ड परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करत आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. शाळेचा यंदाचा एकूण निकाल ९९.२० टक्के लागला असून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या परीक्षेसाठी शाळेतून एकूण १२५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी १२४ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. विशेष कौतुकाची बाब म्हणजे शाळेतील तब्बल ०८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून गुणवत्ता सिद्ध केली आहे.
या निकालात कु. जोशी योगेश विवेकानंद याने ५०० पैकी ४९४ गुण (९८.८०%) मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तसेच दिनेश कृष्णा राऊळ याने ४८७ गुण (९७.४०%) मिळवून द्वितीय, तर कु. अद्विता प्रसाद तेरेदेसाई हिने ४७९ गुण (९५.८०%) मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. आयुष प्रचिमोण परब (४७४ गुण, ९४.८०%), कु. वैष्णवी कृष्णा गावडे (४६१ गुण, ९२.२०%), कु. भैरवी प्रसाद सांगेलकर (४६० गुण, ९२.००%), कु. नक्षत्रा गोविंद वर्णेकर (४५९ गुण, ९१.८०%), कु. रुची बांदेकर (४४८ गुण, ८९.६०%), कु. रामचंद्र जयंत सातवळेकर (४४१ गुण, ८८.२०%), कु. ऋतुजा नरेंद्र नाईक (४४० गुण, ८८.००%), कु. नंदिनी संजय राऊळ (४३८ गुण, ८७.६०%), कु. शुभंकर संजय कुबल (४३६ गुण, ८७.२०%), कु. तनिष्का अजित राणे (४३४ गुण, ८६.८०%), कु. आर्या रणजित परब (४३४ गुण, ८६.८०%), कु. पार्थ प्रवीण दळवी (४३१ गुण, ८६.२०%) आणि कु. रामचंद्र विजय परब (४२९ गुण, ८५.८०%) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
शाळेने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विक्रांत विकास भाई सावंत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाल्याचे प्रशालेकडून सांगण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



