सावंतवाडी,दि.१९: गेले दहा बारा दिवस पडत असलेल्या दाट धुक्यामुळे तसेच अति थंडीमुळे नेमळे तसेच आस पास च्या गावातील आंबा तसेच काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच विपरीत हवामानमुळे आंबा काजू उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सतत पडणाऱी थंडी,दाट धुके, आणि दुपारच्या वेळी कडक ऊन यामुळे मोहोर तर करपून गेलाच परंतु सुपारी एवढी कैरी हीं गळून पडू लागली आहे काही झाडांना दुबार मोहोर येऊ लागला तर काही झाडांना फक्त मोहोराऐवजी पालवी आली आहे नोव्हेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या आता पर्यंत आठ ते दहा वेळा हजारो रुपयांच्या कीटक नाशकाच्या फवारण्या झाल्या मात्र फवारण्या केलेल्या औषधांच्या किमती एवढे हीं आंबे मिळणार नाहीत
तालुक्यात गेले काही दिवस उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे सरासरी ४० डिग्री सेलसिअस पर्यंत तापमान वाढले असून बागायती पिकासाठी अत्यंत धोकादायक आहे या तीव्र उष्णतेमुळे हातातोंडांशी आलेली आंब्याची कोवळी फळे देठाकडे करपून जायला सुरुवात झाली आहे यामुळे निरवडे मंडळातील नेमळे तसेच आस पास च्या गावात फक्त पंधरा टक्के एवढेच आंब्याचे उत्पादन पाहायला मिळणार आहे.
हाच प्रकार काजू पिकाच्या बाबतीत असून काजुचा मोहोर करपून गेल्याने काजुला दुबार मोहोर येणार नाही ही बागायतदार शेतकऱ्याची चिंतेचा विषय बनला आहे पूर्ण वर्षाचा आर्थिक खर्च या मुख्य दोन पिकावरच अवलंबून असल्यामुळे डोक्यावर कांदे घालण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. कृषी विभागाने लवकरात लवकर याचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी नेमळे आंबा बागायतदार तसेच आंबा बागायतदार शेतकरी संघटनेच्या उपाध्यक्षा दिव्या वायगणकर तसेच नेमळे आंबा उत्पादक शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
सावंतवाडी तालुक्यातील निरवडे महसूल मंडळातील हवामानवर आधारित स्वयं चलित यंत्र हे यंत्र चुकीच्या ठिकाणी बसविल्यामुळे हवामानात होणारे बदल स्वयं चलित यंत्रापर्यंत न पोहोचल्या मुळे हवामानातील बदलाची माहिती शासन स्थरावर वेळेत पोहोचत नाही यामुळे शेतकरी नुकसानी पासून वंचित राहणार यासाठी नेमळे मळगाव, निरवडे, गावातील शेतकरी सावंतवाडी तालुका कृषी विभागाचे याकडे लक्ष वेधणार आहेत.
या सततच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम थांबा व काजू बागायतींवर होत असल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.