कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे आणि कोणी बिघाड करत असेल तर कारवाई करण्यात येईल.. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी
सावंतवाडी दि.२७ : शहरात शांतता प्रस्थापित रहावी म्हणून सर्व समाजाच्या बांधवांनी सहकार्य करावे समाजातील तणावामुळे शहराची बदनामी होते त्यामुळे प्रत्येकाने शांतता प्रस्थापित करण्यासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून योग्य ती माहिती पोलिसांना द्यावी असे पोलिस ठाण्यातील बैठकीत ठरले.
सावंतवाडी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,आनारोजीन लोबो, जगदीश मांजरेकर, सिताराम गावडे,राजू बेग, गोविंद वाडकर, श्रीपाद चोडणकर, अभिमन्यू लोंढे, रफिक मेमन, पुंडलिक दळवी, बाळासाहेब बोर्डेकर, तौकीर शेख, संदेश परब, विलास जाधव, अफरोज राजगुरू, दत्ता सावंत,सोहेब बेग, शफीक खान,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले,आगोस्तीन फर्नांडिस आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, शहरात तणाव निर्माण होत नाही. पण दुर्दैवाने घटना घडली लोक रस्त्यावर उतरले पण लोकप्रतिनिधी लोकांना शांतता राखावी म्हणून आवाहन केले पाहिजे होते.शहराची बदनामी होत आहे त्यामुळे प्रत्येक समाजाने शांतता राखावी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. नगरपरिषद स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दारूच्या बाटल्या मिळतात. अवैध धंदे बंद झाले पाहिजे. अवैध धंद्यातून असे प्रकार घडू शकतात.. यावर नियंत्रण आले पाहिजे.
आनारोजीन लोबो म्हणाल्या, प्रशासने शांतता राखण्याचे काम करताना समाजाने देखील शांतता राखावी. माजी नगरसेवक राजू बेग म्हणाले, तो मजकूर व्हाॅटस्पवर आलं ते कोठून आले. ते तपासून घ्या.
सिताराम गावडे म्हणाले,कालची घटना घडली दुर्दैवी आहे.या ठिकाणी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन गुण्यागोविंदाने नांदत आहेत.या ठिकाणी कोणी आहे का? चौकशी झाली पाहिजे.
दरम्यान बोलताना पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी म्हणाले,पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे. शहरात पुन्हा असं घडू नये. सावंतवाडी शहरात अचानक तणाव निर्माण झाला तसे चित्र शहरात नको.ज्याच्या विरोधात तक्रार केली तर कारवाई होईल.कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे आणि कोणी बिघाड करत असेल तर कारवाई करण्यात येईल.
तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या जवळपास फटाके आतषबाजी होते ती बंद करू असे या शांतता समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले.