कोकणातील शिक्षणाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी “सुपर अभिनव” काम करेल…

0
91

अमोल पाटील; सावंतवाडीतील अ‍कॅडमीचा राजे खेमसावंतांच्या हस्ते शुभारंभ…

सावंतवाडी,दि.०७: कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्गात दहावी पर्यंत गुणांचा टक्का राखला जातो. परंतु त्यानंतर मात्र पुढील परिक्षात किंवा स्पर्धा परिक्षात मुले जाताना दिसत नाही. त्यामुळे हा दर्जा कायम ठेवण्याचा प्रयत्न “सुपर अभिनव सायन्स अ‍कॅडमी”च्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असे अभिवचन संस्थेचे संचालक अमोल पाटील यांनी येथे केले. दरम्यान या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी आणि त्यांचे करीयर घडविण्याचे काम आम्ही करणार आहोत. कोल्हापुरनंतर सिंधुदुर्गात हे ध्येय आम्हाला गाठायचे आहे. त्यासाठी येथील विद्यार्थी व पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सावंतवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या “सुुपर अभिवन सायन्स अ‍कॅडमी”चा शुभारंभ नुकताच येथील राजवाड्यात सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक एस. बी. पाटील, सिंधुदुर्ग डिजीटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा ब्रेकिंग मालवणीचे संपादक अमोल टेंबकर, माजगाव सरपंचा सौ. अर्चना सावंत, डेगवे हायस्कुलचे मुख्याध्यापक संजय सावंत, महेंद्र अ‍कॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर, विद्यार्थी पतपेढी संचालक विठ्ठल सावंत, अ‍ॅड. सचिन गावडे, सावंतवाडी अभ्यासकेंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पोळ, दिंगबर मोर्ये आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, आम्ही राज्यात गडहिंग्लज येथे गेली अनेक वर्षे या अ‍कॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत आहोत. गेल्या वर्षी आम्ही अख्या कोल्हापुरात जेईई, एनईईटी या परिक्षांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता सिंधुदुर्ग आणि कोकणातील मुलांना हे शिक्षण देण्याचा आमचा मानस आहे. त्या दृष्टीने तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी येणार्‍या मुलांना घडविण्याचे काम करणार आहोत.
यावेळी खेमसावंत भोसले म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांनी दहावी पर्यंत आपला टक्का राखला. परंतु त्यानंतर योग्य तो मार्गदर्शन नसल्यामुळे पुढील स्पर्धेत ही मुले टिकत नाहीत. त्यामुळे येणार्‍या काळात सुपर अभिनव अ‍कॅडमीच्या माध्यमातून त्यांना नक्कीच वाट मिळेल, असा विश्वास आहे. या ठिकाणी काम करताना संस्थेने चांगले काम करावे, लोकांचा विश्वास ढळणार नाही याची खबरदारी घ्यावी
यावेळी एस. बी. पाटील म्हणाले, संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम आम्ही करीत आहोत. आणि यात नक्कीच यशस्वी होवू यात काही शंका नाही. येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोई उपलब्ध व्हाव्यात हा उद्देश्य ठेवून आमचे काम सुरु आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here