अखेर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे…

0
107

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी

मुंबई,दि.१५: भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र तसेच झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. या घोषणेसह राज्यात आता आचारसंहिता लागू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

महारष्ट्रात २०१९ सालाप्रमाणेच यावेळीही एकाच टप्प्यात निवडणूक होणार तर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान तर निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी लागणार आहे.
अर्जांची तपासणी : ३० ऑक्टोबर २०२४ तर अर्ज मागे घेण्याची तारीख : ४ नोव्हेंबर

याबाबतची माहिती निवडणूक आयोग अधिकारी राजीव कुमार यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here