ग्रामस्थांनी सावंतवाडीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
सावंतवाडी,दि.३० : वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे सावंतवाडी दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे अनेक प्रकारचे नुकसान येथील नागरिकांना सहन करावे लागत आहे. याला फक्त आणि फक्त वीज वितरण कंपनीचा कारभार जबाबदार असल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी यासाठी गुरुवारी सर्वपक्षीय नेतेमंडळी यांनी सावंतवाडी वीज कार्यालयात धडक दिली.
यावेळी सावंतवाडी दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातून बहुसंख्य नागरिक व सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय पदाधिकारी जमले होते. प्रारंभी वीज वितरण कंपनीचा निषेध व्यक्त करत आक्रमकपणे वीज वितरण कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. शहरातील मँगो हॉटेलच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी विविध भागातून आलेल्या नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला चांगलेच धार्यावर धरत आपल्या समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला. या सभेचे इतिवृत्त लिहून त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी उपस्थित सर्वजण आग्रह करत होते.
दरम्यान वीज वितरण अधिकाऱ्यांनी यापुढे विजेच्या संदर्भात असलेल्या समस्या दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे उपस्थित त्यांना आश्वासित केले.
यावेळी भाजपा विधानसभा अध्यक्ष राजन तेली, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, मराठा समाज तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, माजी जि. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद धुरी, शेखर गावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, विलास जाधव, सुरेश भोगटे, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक, माजगाव उपसरपंच बाळू वेझरे, दिलीप भालेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, सावंतवाडी भाजपा मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, संतोष पालेकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष गांवस,बाळा बोर्डेकर, महेश खानोलकर, निलेश मुळीक आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.