महसूल अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या तर वीज अधिका-यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या दिल्या सुचना
कणकवली,दि.०३: तालुक्यातील बेळणे खुर्द येथे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार चक्रीवादळ झाले. विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाल्याने मोठी पडझड झाली. झालेल्या चक्रीवादळात घरांवर झाडे पडून नुकसान झाले व वीज वितरणच्या पोलांवर देखील झाडे पडुन विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. या घटनेची तात्काळ दखल घेवून कणकवलीचे आ. नितेश राणे यांनी बेळणे खुर्द गावातील नुकसान ग्रस्तांची भेट घेवून विचारपुस करत संवाद साधला. आ.नितेश राणे यांनी महसुल विभागाच्या अधिका-यांसह , वीज वितरणच्या अधिका-यांना तात्काळ पंचनामे करा व वीज तातडीने सुरु करा असा सुचना दिल्या. तसेच शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आ. नितेश राणे यांनी नुकसान ग्रस्तांना दिले.
यावेळी संदीप सावंत , भाई आंबेलकर , पंढरी चाळके , राजेंद्र चाळके , प्रथमेश सकपाळ , राजेंद्र तांबे , देवदास करांडे , वैभव चाळके आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.