Site icon Kokandarshan

जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा बदलल्या..

मुंबई,दि.२९ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या तारखा बदलल्या असून आता जिल्हा परिषद निवडणूक २ दिवस लांबणीवर गेल्या आहेत. आता ५ फेब्रुवारी ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहेत. तर ७ ऐवजी ९ फेब्रुवारीला निकाल लागेल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. तारखा बदलल्याने उमेदवारांना आता प्रचारासाठी थोडा दिलासा मिळाला असून निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे प्रचारासाठी दोन दिवसांची वाढ मिळाली आहे.

Exit mobile version